नमस्कार मित्रांनो, आज आपण दोन महत्वाच्या योजना समजून घेणार आहोत. एक योजना केंद्र सरकारची आहे – पीएम किसान योजना, आणि दुसरी राज्य सरकारची – नमो शेतकरी योजना.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, दोन्ही योजनांचे पैसे म्हणजेच पीएम किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
या दोन्ही योजनांमधून मिळून शेतकऱ्यांना एकूण 4000 रुपये मिळतील. हे पैसे पेरणीच्या काळात मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत आणि इतर शेतकामासाठी उपयोग होईल.
आत्ता खरीप हंगाम सुरू झालाय आणि शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. त्यामुळे या पैशांची त्यांना खूप मदत होईल.
93 लाख शेतकऱ्यांना फायदा
सध्या महाराष्ट्रात सुमारे 93 लाख 50 हजार शेतकरी या योजनांचे लाभार्थी आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत. पण त्याआधी शेतकऱ्यांची कागदपत्रं तपासली जाणार आहेत म्हणजे योग्य शेतकऱ्यालाच पैसे मिळतील.
डीबीटीद्वारे पैसे जमा
हे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होतील. पण त्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत:
- तुमच्या खात्याला आधार नंबर लिंक असावा
- मोबाईल नंबर लिंक असावा
- जमिनीचे कागद ऑनलाईन असावेत
काही शेतकऱ्यांचे मागचे हप्ते तांत्रिक अडचणीमुळे जमा झाले नव्हते. आता लवकरच ते पैसे पण जमा होतील. सरकारने तांत्रिक अडचणी लवकर सोडवण्याचे आदेश दिले आहेत.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना काय आहेत?
पीएम किसान योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये दिले जातात – प्रत्येक 4 महिन्यांनी 2000 रुपये.
ही योजना पाहून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. यातही वर्षभरात 6000 रुपये मिळतात.
या दोन्ही योजना एकत्र केल्यावर शेतकऱ्याला दर हप्त्याला जास्त रक्कम मिळते. अनेकवेळा दोन्ही योजनांचे पैसे एकाचवेळी खात्यात जमा होतात.
मुख्यमंत्र्यांची नवी घोषणा – हप्ता वाढणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षभरात 9000 रुपये मिळतील. त्यामुळे एकत्रितपणे 5000 रुपये सुद्धा एकाच वेळी खात्यात येऊ शकतात.
फार्मर आयडी गरजेचा
आता केंद्र सरकारने एक नवीन नियम आणला आहे – प्रत्येक शेतकऱ्याला Farmer ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार करावं लागेल. जर तुमच्याकडे हे ओळखपत्र नसेल तर तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
पैसे कधी जमा होतील?
सध्या अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण चर्चा अशी आहे की 15 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. यामुळे शेतकरी वेळेवर बी-बियाणे आणि खत खरेदी करू शकतील.
शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि जमिनीचे कागद अपडेट करून ठेवावेत. तसेच लवकरात लवकर फार्मर आयडी सुद्धा बनवून घ्यावी. म्हणजे कोणतीही सरकारी योजना तुमच्या हातून सुटणार नाही.